whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

HSC Result : ब्रेकिंग! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, 'असा' पहा निकाल!

तारीख : 20-05-2024श्रेणी :शिक्षण

feature image
whatsapp

Maharashtra : महत्त्वाची बातमी! राज्यातील शाळांमध्ये आता शिक्षकांची कंत्राटी भरती; राज्य सरकारचा नवा निर्णय

तारीख : 22-05-2025श्रेणी :शिक्षण

feature image

पुणे (Pune) : आदिवासी विभागाने आश्रम शाळांमध्ये शिक्षकांच्या १७९१ मंजूर पदांची सेवा बाह्यस्रोतांद्वारे (कंत्राटी) उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी ८४ कोटी ७४ लाख ५५ हजार रुपये इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.


आदिवासी विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. १६ नोव्हेंबर २०२२च्या निर्णयाद्वारे आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे. या सुधारित आकृतिबंधानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांतील शिक्षकांच्या मंजूर १७९१ पदांच्या सेवा बाह्यस्रोतांद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी जीईएम संकेतस्थळावर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.


बाह्यस्रोतांद्वारे उपलब्ध केल्या जाणाऱ्या शिक्षकांमध्ये २२९ उच्च माध्यमिक शिक्षक, ४५५ माध्यमिक शिक्षक, १२० पदवीधर प्राथमिक शिक्षक, १७८ प्राथमिक शिक्षा इंग्रजी, ८०९ प्राथमिक शिक्षक मराठी यांचा समावेश असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.


मात्र, 'राज्यात शिक्षकांच्या भरतीसाठी पवित्र संकेतस्थळामार्फत प्रक्रिया राबवण्यात येत असताना आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारितील शाळांमध्ये बाह्यस्रोतांद्वारे शिक्षकांची सेवा घेण्याचा अर्थ काय,' असा सवाल माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, 'शिक्षण घेऊन पात्रता मिळवलेल्या, शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी यातून काय अर्थ घ्यायचा? २०२२मधील प्रस्ताव आता मंजूर केला जातो, म्हणजे इतकी प्रचंड पदे अद्याप भरलेली नाहीत हे आश्चर्य आहे. शिक्षण क्षेत्रात नेहमी विसंगत आदेशांचा अनुभव येत आहे.'


आश्रम शाळा किती?


आदिवासी विकास विभागांच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, अतिदुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लोकांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास जलदगतीने घडवून आणण्यासाठी १९७२-७३ पासून शासनाने निवासी आश्रमशाळा समूह योजना कार्यान्वित केलेली आहे. ही योजना मुख्यत्वे अतिदुर्गम, डोंगराळ व पाड्यातील आदिवासी मुला- मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना सुशिक्षित करणे आणि त्यायोगे त्यांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने राबविण्यात येते. शिक्षणाची गंगा दऱ्याखोऱ्यांत, दुर्गम पाड्यांत पोहोचविण्याचे काम शासकीय आश्रम शाळांमार्फत होत आहे. आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारित ४९७ शासकीय आश्रम शाळा, ५५६ अनुदानित आश्रम शाळा आहेत.

whatsapp

10th Result : ठरलं तर! यंदाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार; राज्य मंडळाची मोठी घोषणा

तारीख : 12-05-2025श्रेणी :शिक्षण

feature image

पुणे (Pune) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. यंदा दहावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत  लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थी पालकांचे निकालाच्या तारखेकडे लक्ष लागले होते.


त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (१३ मे) जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. 


राज्यभरातील सुमारे १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यंदा परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे कॉपीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल दीड टक्क्याने घटलाअसताना दहावीचा निकाल वाढणार की घटणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.

whatsapp

Maval News : पवना शिक्षण संकुलाचा बारावीचा शंभर टक्के निकाल, यंदाही मुलींचीच बाजी; जाणून घ्या, संपूर्ण निकाल?

तारीख : 06-05-2025श्रेणी :शिक्षण

feature image

पवनानगर (Pawnanagar) : येथील लायन्स शांता माणेक पवना आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजने आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. तीनही विभागात मुलींनी बाजी मारली आहे. कॉलेजमधून १३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १३४ उत्तीर्ण झाले आहेत. कॉलेजचा सरासरी निकाल ९७.८१ टक्के निलाल लागला असून सायन्स कॉलेजचा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकाल लागत असल्याची माहिती पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी दिली.


निकाल खालीलप्रमाणे (कसांत टक्केवारी)


वाणिज्य विभाग - ९८.५१ टक्के

१) तुपे दिक्षा गोपाळ - ८४.६७ टक्के 
२) मोहोळ अर्पिता हरिश्चंद्र - ७९.८३ टक्के 
३) सुतार श्वेता शशिकांत - ७६.६७ टक्के


कला विभाग - ९३.३३ टक्के


१) यादव श्रेया राजू - ८२.५० टक्के 
२) तुपे सायली बाळू - ७०.६७ टक्के 
३) अल्हाट समिक्षा भाऊ - ७० टक्के


सायन्स विभाग - १०० टक्के


१) दळवी समृद्धी बाळासाहेब - ७४.१७ टक्के 
२) अहिर किशन काळूराम - ६५.१७ टक्के 
३) लोहर चैतन्य विजय - ६१ टक्के


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरातुन कौतुक होत आहे. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार खजिनदार राजेश म्हस्के यांनी यशस्वी विद्यार्थी व संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे, शहाजी लाखे यांच्यासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापक सर्वांचे अभिनंदन केले.

whatsapp

Talegaon News : मंथन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत पैसाफंड प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश

तारीख : 11-04-2025श्रेणी :शिक्षण

feature image

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : मंथन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून या परीक्षेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित पैसाफंड प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.


या परीक्षेत इयत्ता दुसरीच्या वर्गातील कु. ईश्वरी अरविंद गुरव या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक प्राप्त केला. तर पुणे विभागात जिल्हास्तरीय यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कु. दिशा तुषार पाटील या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक तसेच पुणे विभाग जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.


तर प्रियश शरद फडतरे या विद्यार्थ्याने राज्य स्तरीय गुणवत्ता यादीत  नववा क्रमांक तसेच पुणे विभाग जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कु. गौरी सुशील चव्हाण या विद्यार्थिनीने राज्य गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक तसेच पुणे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीच्या वर्गशिक्षिका पल्लवी जगताप व इयत्ता पहिलीच्या वर्ग शिक्षिका आशा लबडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या चारही विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा पुन्हा रोवला आहे.


नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, सचिव संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, संस्थेचे ज्येष्ठ संचालक सोनबा गोपाळे, महेशभाई शहा, शालेय समिती अध्यक्ष विनायक अभ्यंकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता लादे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


गुणवत्ता धारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे - कंसात मिळविलेले गुण


इयत्ता दुसरी


▪️ ईश्वरी अरविंद गुरव - १४२ /१५०
 (राज्यात पाचवा व जिल्ह्यात प्रथम)
 ▪️ दिशा तुषार पाटील - १३८/१५०
 (राज्यात सातवा व जिल्ह्यात दुसरा)
 ▪️ प्रियश शरद फडतरे - १३४/ १५०
 (राज्यात नववा व जिल्ह्यात चौथा)


इयत्ता पहिली


▪️ गौरी सुशील चव्हाण- १३६/१५० 
 (राज्यात आठवा व जिल्ह्यात तिसरा)

whatsapp

Lonavala News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर - प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख

तारीख : 27-02-2025श्रेणी :शिक्षण

feature image

लोणावळा (Lonavala) : मराठी भाषेचा इतिहास अडीच हजार वर्षांपूर्वी पासूनचा आहे. संतापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत मराठी भाषेत मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मिती झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभरात मराठी भाषेला अग्रक्रम दिला आहे, असे मत लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी व्यक्त केले.


मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोणावळा महाविद्यालयाचा मराठी विभाग, ग्रंथालय विभाग, सांस्कृतिक विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने ग्रंथदिंडी व मराठी स्वाक्षरी मोहीम या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख बोलत होते. 


लोणावळा शिक्षण संस्थेचे विश्वस्त व युवा उद्योजक सुनील ठोंबरे यांच्या शुभहस्ते ग्रंथदिंडीचे पूजन व शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नारायण पाळेकर, परीक्षा विभाग व मराठी विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र देवरे, डॉ. धनराज पाटील, ग्रंथालय प्रमुख चांगुणा ठाकर-येवले, प्रा. भक्ती अहीर, डॉ. अमर काटकर, डॉ. नितीन बोडके, डॉ. संदीप सोनटक्के, प्रा. भारती देशमुख, प्रा. अनी वर्गीस, डॉ. रंजुबाला चोपडा, प्रा. योगिता मोरे, डॉ. संदीप पोकळे,  डॉ. श्रीकांत होगले, प्रा. संदीप लबडे, डॉ. पवन शिनगारे, डॉ. मल्हारी नागटिळक, डॉ. दीपक कदम, प्रा. संजय साळुंखे, प्रा. रोहन वर्तक, प्रा. गणेश आखाडे, प्रा. अमोल नवघिरे, प्रा. समीर गायकवाड, प्रा. पल्लवी तिखे, तेजस भांगरे, राकेश साळुंखे, रवींद्र उंबरे, वलवण गावच्या पोलीस पाटील अर्चना देशमुख, विलास इंगुळकर, दीपक राक्षे, उल्हास पाळेकर आदी उपस्थित होते.


डॉ. देशमुख म्हणाले, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान मोलाचे आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने विस्तार करण्याचे अनमोल कार्य केले आहे. सर्व संतानी मराठी भाषेतून ग्रंथनिर्मिती करून येथील समाजाचे एकप्रकारे प्रबोधन करण्याचे काम केले.


छत्रपती शिवाजी महाराजांनीही मराठी भाषेला आपल्या राज्यकारभारात राज्यकारभाराची भाषा म्हणून मान्यता दिली होती. आज याच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. यापुढे शिक्षण क्षेत्रातील सर्व विद्याशाखामध्ये मराठी भाषेचा वापर वाढणार असल्याने हि मराठी भाषिकांच्या दृष्टीने गौरवास्पद बाब आहे.


या कार्यक्रमासाठी तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष शिंदे यांनी केले. डॉ. धनराज पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप खाडे यांनी केले.

whatsapp