तारीख : 25-06-2025श्रेणी :राजकारण
तारीख : 23-06-2025श्रेणी :राजकारण
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : “मी आमदार आहे, कारण तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात. आज निर्णय घ्यायचे असतील, तर तोही तुमच्या सल्ल्यानेच घ्यायचा,” असे स्पष्ट शब्दांत सांगत आमदार सुनील शेळके यांनी पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका मांडली.
वडगाव मावळ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष संघटनेच्या सुदृढ बांधणीसाठी नवे संकेत दिले गेले. आमदार सुनील शेळके यांच्या सडेतोड भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. पक्षातील निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, २० सदस्यीय समितीचा निर्णायक हस्तक्षेप, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन यामुळे हा मेळावा यशस्वी ठरला.
मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, गणेश आप्पा ढोरे, सुरेश चौधरी, विठ्ठल आण्णा शिंदे, महादू कालेकर, काळूराम मालपोटे, दीपक हुलावळे, कृष्णा कारके, नारायण पाळेकर, तुकाराम आसवले, भरत येवले, सुहास गरुड, लक्ष्मण बालगुडे, नामदेव ठुले, प्रवीण झेंडे, विलास बडेकर, सुरेश धोत्रे, अशोक भेगडे, दर्शन खांडगे, साहेबराव कारके, संदीप आंद्रे, भरत भोते, जीवन गायकवाड, किशोर सातकर, रुपेश घोजगे, मारुती देशमुख, पंढरीनाथ ढोरे, बाबूलाल नालबंद, प्रकाश हगवणे, कांतीलाल काळोखे, भरत लिम्हण, सुवर्णताई राऊत शोभाताई कदम, पूजाताई दिवटे, कल्याणीताई काजळे,शबनम खान, तेजस्विनी गरुड, सुनीता कुडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनात्मक आढावा व नियोजन
या बैठकीत आतापर्यंतच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मैदानी पातळीवर कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर ठोस उपाय सुचविण्यात आले. संघटनात्मक बळकटी, कार्यपद्धतीतील सुधारणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे नियोजन या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणासाठी एकजुटीने अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शेळके यांचे ठाम विधान – “नेतृत्व नव्हे, निर्णय आता कार्यकर्त्यांचे”
आमदार शेळके यांनी पक्षातील महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेसाठी २० जणांची समिती नियुक्त केली असून, "या समितीचा निर्णय मला देखील बंधनकारक असेल," अशी ऐतिहासिक भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट केले की गाव अध्यक्ष, उमेदवार निवड, निधी मंजुरी यासारख्या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांचा आवाज निर्णायक असेल.
भाजपवर टीका करत ते म्हणाले, “पूर्वी म्हणायचे – तुम लढो, हम कपडे संभालेंगे, आता म्हणतात – तुम लढो, हम कॉन्ट्रॅक्ट संभालेंगे… ही भूमिका आता सहन केली जाणार नाही.” त्यांनी भाजपमधील आपल्या ३० वर्षांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत, “भारतीय जनता पक्षात सामान्य कार्यकर्ता संपला आहे, पण राष्ट्रवादीत तो केंद्रस्थानी आहे,” अशी ठाम मांडणी केली.
नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व संघटनात्मक विस्तार
या मेळाव्यात खालील पदाधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली –
सुवर्णा राऊत – महिला अध्यक्ष, मावळ तालुका
वर्षा नवघणे – ग्रामीण महिला अध्यक्ष
सुरेश धोत्रे – तळेगाव शहर अध्यक्ष
सुशांत बालगुडे – विद्यार्थी आघाडी अध्यक्ष
रवी पवार – सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष
कुणाल आगळे – सामाजिक न्याय विभाग, तळेगाव शहर
निलेश टाक – सामाजिक न्याय विभाग, देहूरोड शहर
हरिश्चंद्र बगाड – आदिवासी सेल अध्यक्ष, मावळ तालुका
संघर्षाला न्याय, संघटनेला बळ
शेवटी आमदार शेळके म्हणाले, “माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही माझ्यासोबत होतात, आता मी तुमच्या मागे उभा आहे. कोणाला सरपंच करायचं, कोणाला नगरसेवक करायचं, हे सर्व निर्णय आता कार्यकर्त्यांच्या हाती आहेत. संघर्ष कमी करा, पण न्याय सर्वांना मिळालाच पाहिजे.”
या मेळाव्याने मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीचे व राजकीय एकजुटीचे दर्शन घडवले.
तारीख : 18-06-2025श्रेणी :राजकारण
पुणे (Pune) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले.
यावेळी आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.
दर्शनानंतर संस्थानच्यावतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, 'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
तारीख : 18-06-2025श्रेणी :राजकारण
पुणे (Pune) : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे साकव पूल पडून झालेल्या दुर्घटनेची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन घेतली. या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर तातडीने सुरुवात करून लवकरात लवकर उभारणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, मावळचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकारी तसेच स्थानिकांकडून घटनेबाबत तसेच बचाव कार्याबाबत माहिती घेतली. तातडीने धाव घेऊन बचावकार्य केलेल्या स्थानिक नागरिकांना त्यांनी शाबासकी दिली.
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना पवार म्हणाले, मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बचाव कार्यासाठी अत्याधुनिक वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल.
घटनेची चौकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता आदींसह निवासी उपजिल्हाधिकारी यांची समिती नेमली आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.
अपघातग्रस्त पुलाचा उर्वरित सर्व भाग पाडण्यात येणार आहे. याशिवाय आयुष्य संपलेले तसेच स्ट्रक्चरल ऑडिटर्स यांनी वापरण्यास धोकादायक असा शेरा दिलेले इतरही सर्व धोकादायक पूल पाडण्यात येतील, असेही पवार म्हणाले.
नवीन पूल दर्शक गॅलरीसह बांधण्यात येणार
या ठिकाणी साडेसात मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार असून त्याच्या दोन्ही बाजूला ८ फुटाचे दोन पदपथ करण्यात येणार आहे. तसेच हे पर्यटन स्थळ असल्याने दोन दर्शक गॅलरी (व्यूविंग गॅलरी) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पावसानंतर तातडीने पुलाच्या कामाला सुरुवात करावी, असे निर्देश यावेळी संबंधित बांधकाम कंत्राटदाराला दिले.
उपमुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयात जखमींची विचारपूस
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवना रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेतील जखमी रुग्णांची भेट घेतली. तसेच जखमींवर आवश्यक ते सर्व उपचार होतील याची काळजी घ्यावी असे डॉक्टरांना निर्देश दिले. या कामात समन्वयाची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांवर राहील, असेही ते म्हणाले.
तारीख : 30-05-2025श्रेणी :राजकारण
पवनानगर (Pawnanagar) : कोथुर्णे विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मसुरकर तर उपाध्यक्षपदी दादु कदम यांची बिनविरोध निवड झाली.
मावळते अध्यक्ष यशवंत बोडके व उपाध्यक्ष गबळू काळे यांनी ठरलेल्या कालखंडात राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सोसायटीच्या अध्यक्षपदी मसुरकर यांची बिनविरोध तर उपाध्यक्षपदी कदम यांची निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी राकेश निखारे व सचिव रामदास पाठारे, संदिप साबळे यांच्या यांनी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी संचालक ज्ञानेश्वर निंबळे, लक्ष्मण काळे, वाघू दळवी, यशवंत बोडके, संभाजी काळे, मथाबाई काळे, बाळु दळवी, गबळु काळे, सरपंच सुरेश दळवी, ज्ञानदेव सोनवणे, राम नढे, विठ्ठल दळवी, भरत दळवी, संजय मोहोळ, रमेश कालेकर, बाळासाहेब मोहोळ, भिमराव दळवी, सुर्यकांत दळवी, संजय दळवी, शिवाजी निंबळे, नामदेव दळवी, मारुती दळवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना बाळासाहेब मसुरकर म्हणाले की, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
तारीख : 29-05-2025श्रेणी :राजकारण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : तळेगाव दाभाडे शहर आणि सोमाटणे ग्रामपंचायत यांच्या मध्ये वसलेली ठाकर वस्ती ही प्रशासकीय दृष्ट्या त्रिशंकू स्थितीत असल्यामुळे आजपर्यंत दुर्लक्षित राहिली होती. मात्र, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सूचनेनुसार आज या वस्तीला तालुका प्रशासनाने पहिल्यांदाच भेट दिली.
या दौऱ्यात तहसीलदार विक्रम देशमुख आणि गटविकास अधिकारी (बीडीओ) कुलदीप प्रधान यांनी ठाकर वस्तीतील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना सुचवल्या. घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वस्तीतील नागरिकांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिले होते. प्रशासनाचा हा दौरा ठाकर वस्तीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात असून, प्रत्यक्ष संवादातून विकासाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला.
दौर्यावेळी ग्रामसेवक खोमणे, आमदार कार्यालयाचे प्रतिनिधी सचिन वामन, शाम शेळके, अनिल जाधव, अशोक गावडे, अश्विन केदारी, राहुल जाधव, सुरेश केदारी, राजू गावडे आदी उपस्थित होते. स्थानिक महिला व ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
हा दौरा ठाकर वस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरले असून, प्रशासन व जनप्रतिनिधींमधील समन्वयाचे प्रत्यक्ष उदाहरण यातून दिसून आले आहे.