whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

Talegaon News : एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या अँटीरेट्रोव्हायरल थेरपी केंद्राला 'उत्तम कामगिरी' केल्याबद्दल पुरस्कार

तारीख : 14-06-2024श्रेणी :आरोग्य

feature image
whatsapp

GBS Precautions : गिअन-बरे सिंड्रोम : आहार आणि स्वच्छतेच्या रणनीतींनी धोका टाळा

तारीख : 24-02-2025श्रेणी :आरोग्य

feature image

कामशेत (Kamshet) : कधी विचार केला आहे का की आपल्या शरीराची संरक्षण करणारी प्रणाली म्हणजेच प्रतिकारशक्तीच जर आपल्यावर हल्ला करू लागली, तर काय होईल? गिअन-बरे सिंड्रोम (GBS) हा अशाच प्रकारचा दुर्मिळ आणि रहस्यमय आजार आहे, जिथे शरीर स्वतःच्या मज्जातंतूंना परक्या शत्रूप्रमाणे ओळखून त्यांच्यावर हल्ला चढवते. परिणामी सुरुवातीला किरकोळ वाटणारा अशक्तपणा शरीरभर पसरू शकतो. स्नायूंना शक्ती कमी पडू शकते आणि कधीकधी श्वास घेणंही कठीण होऊ शकतं. पण प्रश्न असा आहे की हा आजार का होतो? आणि आपण त्याचा धोका कसा टाळू शकतो? उत्तर आहे, योग्य आहार आणि स्वच्छतेच्या सवयी!


पचनसंस्था आणि प्रतिकारशक्ती यांचा गुंतागुंतीचा संबंध


बहुतेक लोकांना माहीत नसतं की आपल्या पचनसंस्थेचं आणि प्रतिकारशक्तीचं अतूट नातं आहे. खरंतर, आपल्या शरीरातील ७०% प्रतिकारशक्ती पचनसंस्थेशी निगडित आहे. त्यामुळे, चुकीचा आहार घेतल्यास किंवा दूषित अन्न सेवन केल्यास, प्रतिकारशक्ती गोंधळलेली प्रतिक्रिया देऊ शकते, आणि त्यातून GBS सारख्या ऑटोइम्यून आजारांचा धोका वाढू शकतो.


GBS च्या मागे एक सामान्य परंतू घातक गुन्हेगार आहे. Campylobacter jejuni नावाचा जीवाणू. हा जंतू दूषित अन्न किंवा पाणी सेवन केल्यामुळे शरीरात प्रवेश करतो आणि प्रतिकारशक्तीला गोंधळात टाकतो. परिणामी, हा आजार झडतो.


आहार : मज्जातंतूंसाठी पोषणदायी संरक्षण!


▪️ (व्हिटॅमिन C, E, आणि सेलेनियम) : हे शरीरात जळजळ होण्यापासून संरक्षण करतात आणि मज्जातंतूंचं आरोग्य सुधारतात.


▪️ (संत्री, लिंबू, बेरीज, लसूण)ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स : हे स्नायू आणि मज्जातंतूंची पुनर्बांधणी करण्यास मदत करतात.


▪️ (बदाम, भोपळ्याच्या बिया, जवस, अक्रोड) जीवनसत्त्वे (विशेषतः बी १२ आणि फॉलिक अॅसिड) : मज्जातंतूंच्या सुरळीत कार्यासाठी आवश्यक.


▪️ (अंडी, दूध, पालक) प्रोबायोटिक्स : पचनसंस्था आणि प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उपयोगी.


▪️ (दही, ताक, आंबवलेले पदार्थ) स्वच्छता : सूक्ष्मजंतूंचा प्रभाव टाळण्यासाठी पहिली ढाल.


GBS चा धोका टाळायचा असेल, तर संसर्ग टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काही सोप्या पण प्रभावी सवयी अंगीकारा!


▪️ हात स्वच्छ धुण्याची सवय : साधी वाटणारी ही सवय Campylobacter आणि इतर संसर्गजन्य जंतूंपासून संरक्षण करते.


▪️ अन्न पूर्ण शिजवून खा : कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस आणि दूषित पाणी टाळा.


▪️ स्वच्छ पाणी वापरा : दूषित पाण्यामुळे अन्नविषबाधा होण्याची शक्यता जास्त असते.


whatsapp

Dr. Vikesh Mutha : कामशेत येथील महावीर हॉस्पिटलचे डॉ. विकेश मुथा यांना धन्वंतरी पुरस्कार

तारीख : 16-07-2024श्रेणी :आरोग्य

feature image

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल कामशेत येथील डॉ. विकेश मुथा यांना रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्सच्या वतीने डॉक्टर डे निमित्त धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


क्लबच्या वतीने शनिवारी (दि. ६) डॉक्टर डे व सीए डे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मायमर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, डॉ. शाळीग्राम भंडारी, असिस्टंट गव्हर्नर रवींद्र भावे, चॅलेंजर्स क्लबच्या अध्यक्षा ज्योती राजिवडे, उपाध्यक्ष संदीप भोसलकर, रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, अध्यक्ष किरण ओसवाल, उपाध्यक्ष भगवान शिंदे, सुरेश शेंडे, नितीन शहा, सुरेश दाभाडे, सुरेश धोत्रे, संजय मेहता, रामनाथ कलावडे, स्वाती मुठे, यांच्यासह रोटरी सदस्य उपस्थित होते.


डॉ. दर्पण महेशगौरी व मान्यवरांच्या हस्ते डॉ. उन्मेश गुट्टे डॉ. सौरभ मेहता, डॉ. धनश्री काळे, डॉ. गणपत जाधव, या डॉक्टरांचा तर चार्टर्ड अकाउंटंट स्वानंद आगाशे, अमित कुमार, प्रसाद शिंदे यांना गौरविण्यात आले. दिव्यांग बांधवांच्या चॅलेंजर्सकडून मिळालेला हा पुरस्कार इतर पुरस्कारांपेक्षा आगळावेगळा आहे. पुरस्काराने प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन डॉ. विकेश मुथा यांनी केले.


ज्योती राजीवडे, डॉ. दर्पण महेशगौरी, डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले. संजय मेहता यांनी प्रास्ताविक केले. दिलीप पारेख यांनी सूत्रसंचालन केले. संदीप भोसलकर यांनी आभार मानले. नियोजन चॅलेंजर्सच्या सदस्यांनी केले.

whatsapp

Maval News : मावळात दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण; बदलत्या वातावरणामुळे थंडी-तापाचे रुग्ण वाढले

तारीख : 19-05-2024श्रेणी :आरोग्य

feature image

कामशेत (Kamshet) : गेल्या चार ते पाच दिवसांपासून संपूर्ण मावळ तालुक्यासह कामशेत शहराचे वातावरण बदलले आहे. दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण व पाऊस असे वातावरण आहे. या बदललेल्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, थंडी-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.


शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची गर्दी वाढली


वातावरणातील सततच्या बदलामुळे तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र कामशेत, काले ग्रामीण रुग्णालय या शासकीय व सर्वच खासगी दवाखान्यांमध्ये देखील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यात महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांमध्ये थंडी, ताप, सर्दी, खोकला व अंगदुखी अशी लक्षणे आढळत आहेत. तर लहान मुलांमध्ये श्वसनाच्या विकारांमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे.


आरोग्याची कशी काळजी घ्याल?


आपल्या शरीराला उन्हाळ्याच्या काळात जास्त पाण्याची गरज असते. इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात प्रत्येकाने कमी कॅलरी युक्त अन्न खाणे आवश्यक आहे. विशेषत: तळलेले-भाजलेले आणि मसालेदार अन्न टाळावे. तसेच, आपल्या आहारामध्ये पौष्टिक घटकांचा समावेश करा. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा, ज्यामुळे त्यांचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते. प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे आपण खोकला आणि सर्दीसारखे आजार दूर राहतील. याशिवाय सलाड आणि सहज पचेल असे अन्न खावे, असा सल्ला आरोग्य तज्ञांनी दिला आहे.  

 

वातावरणात झालेल्या बदलामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. परिणामी लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढते. सध्या शहरातील वातावरणामध्ये बदल झाला आहे. त्यामुळे थंडी, ताप तसेच अंगदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तत्काळ दवाखान्यात तपासणी करून घ्यावी.
- डॉ. विकेश मुथा (महावीर हॉस्पिटल, कामशेत)
whatsapp

Takwe News : निगडे येथे आयोजित आरोग्य शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद

तारीख : 16-03-2024श्रेणी :आरोग्य

feature image

टाकवे बुद्रुक (Takwe Budruk) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून निगडे (ता. मावळ) येथे टेनेको क्लीन एअर इंडिया लिमिटेड आणि सार्थक वेलफेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी, रक्ताच्या विविध तपासण्या आणि औषधे वाटप असे या शिबीराचे स्वरूप होते.


या शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून निगडे आणि आसपासच्या जवळपास २५० ग्रामस्थांनी या शिबीराचा लाभ घेतला. तसेच यावेळी लहान मुलांची देखील आरोग्य तपासणी करून त्यांना औषध वाटप करण्यात आले असल्याची माहिती सरपंच भिकाजी भागवत यांनी दिली.


शिबिरास टेनेको कंपनीचे प्रकल्प प्रमुख संजय अव्हाळे, एच आर प्रमुख तुषार पवार, निगडे गावचे सरपंच भिकाजी भागवत, कल्हाटचे सरपंच शिवाजी करवंदे, भोयरे सरपंच वर्षा भोईरकर, आंबळेच्या सरपंच आशा कदम व यांसह निगडे, कल्हाट आणि भोयरे गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


शिबिराचे नियोजन सार्थक वेलफेअर फाउंडेशनच्या सीईओ मृणाल राजहंस, प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम मदने तसेच संगीता सबनीस, स्वप्नील शेंडगे, अर्चना जोशी, अंजली पिटके यांनी केले होते. तर उपस्थित नागरिकांची तपासणी डॉ. प्रसाद राजहंस, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. मनीषा पाटील, डॉ. वैशाली कुलकर्णी तसेच डॉ. नीना पाटील यांनी केली. शिबिराच्या शेवटी ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सरपंच भिकाजी भागवत यांनी आभार मानले.

whatsapp

Polio vaccine : ३ मार्चला संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम; पाच वर्षाखालील मुला-मुलींना पोलिओची लस द्यावी - आरोग्यमंत्री तानाजी सावंत

तारीख : 02-03-2024श्रेणी :आरोग्य

feature image

प्रजावार्ता : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने 'दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' हे घोषवाक्य घेऊन ३ मार्च २०२४ रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. या दिवशी ग्रामीण व शहरी भागातील ५ वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस दिली जाणार असून, सर्व नागरिकांनी आपल्या पाच वर्षाखालील मुला-मुलींना पोलिओची लस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

आरोग्य विभागाच्या या मोहिमेअंतर्गत राज्यातील पाच वर्षाखालील १ कोटी १३ लाख ७० हजार ४४३ बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यभरात ८९,२९९ बुथ उभारण्यात आले असून सुमारे २ लाख २१ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी या बुथवर कार्यरत असतील. याशिवाय तीन कोटींपेक्षा अधिक घरांना मोहिमेअंतर्गत भेट दिली जाणार आहे. तसेच एकही बालक पोलिओच्या डोस पासून वंचित राहू नये यासाठी फिरती पथके आणि रात्रीची पथकेही कार्यरत असणार आहेत.

पल्स पोलिओ मोहिमेसंदर्भात राज्यस्तरीय टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली असून सर्व जिल्ह्यातही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली आहे. अति जोखमीच्या क्षेत्राकडे अधिक लक्ष देऊन एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. जिल्हा स्तराप्रमाणेच तालुका आणि ग्रामीण स्तरावरही लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने या लसीकरण मोहिमेसाठी आपली यंत्रणा सज्ज केली असून जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील पाच वर्षांपर्यंतचा एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिवशी डोस न घेऊ शकणाऱ्या वंचित बालकांना गृहभेटी दरम्यान पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये आरोग्य विभागासोबतच जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ युएसएड, लायन्स क्लब रोटरी क्लब व स्वयंसेवी संस्था तसेच बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग आदी विभागांचा सहभाग असणार आहे.
 

whatsapp