तारीख : 22-04-2025श्रेणी :राजकारण
तारीख : 20-04-2025श्रेणी :राजकारण
पवनानगर (Pawnanagar) : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नुकताच लोहगड किल्ला व शिवस्मारक परिसराच्या विकास कामासंदर्भात आढावा घेतला. लोहगड विसापूर विकास मंच गेले पंचवीस वर्षे लोहगड किल्ला व शिवस्मारक कसे काम करतो याची माहिती संस्थापक सचिन टेकवडे यांनी दिली. त्याचबरोबर शिवस्मारकाच्या राहिलेल्या कामाला गती देण्याची विनंती केली.
प्रथम खासदार आप्पा बारणे यांनी शिवस्मारक परिसराची पाहणी करून प्रस्तावित विकास आराखडा बारकाईने समजून घेतला. तसेच, यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. नंतर त्यांनी लोहगड किल्ला चढून जाऊन संपूर्ण किल्ल्याच्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करून काही सूचना केल्या. भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी गजानन मुंढावरे यांनी त्यांना किल्ल्याच्या सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा दिला.
यावेळी मंचाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच सोनाली बैकर, गणेश धानिवले, अलका धानिवले, रमेश बैकर, सोमनाथ बैकर, महेश शेळके, सचिन भोरडे, नागेश मरगळे, अभिषेक बैकर, पंढरीनाथ विखार, ज्योतीताई धानिवले, काजल ढाकोळ, स्नेहल बैकर, स्वाती मरगळे, बाळू ढाकोळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, मार्गदर्शक संदीप गाडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, अनिकेत आंबेकर, सचिन निंबाळकर, बसप्पा भंडारी, अमोल गोरे यांनी खासदार साहेबांचे आभार मानले
त्याचबरोबर कार्यक्रमास शेखर भोसले, शरद हुलावळे, दत्तात्रय केदारी, प्रकाश गुजर, मुन्ना मोरे, सुनील हरवणे, अमित कुंभार उपस्थित होते.
लोहगडावरील सुधारणा
श्री. शिवाजी रायगड मंडळ संचालित लोहगड विसापूर विकास मंचातर्फे सर्वप्रथम लोहगडला दुरुस्ती चालू झाली. गडावरील जीर्ण झालेले शिवमंदिराचा ग्रामस्थांच्या सहकार्याने जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर महाशिवरात्री यात्रा चालू झाली. पुरातत्व विभागाने गडाला नवीन गणेश दरवाजा बसवला. मंचाने पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी गडाच्या सुधारणांचा पाठपुरावा केला. पुरातत्व विभागाने चांगली साथ दिली. गडाला पायऱ्या, बुरुज, तटबंदी आदींच्या दुरुस्तीची कामे चालू झाली. त्याचवेळी विसापूर वरील शिवमंदिर जीर्ण होऊन पडल्यानंतर त्याचाही पाठपुरावा मंचाने केला व पुरातत्व विभागाने शिवमंदिराची पुनर्बांधणी केली. अशा प्रकारे लोहगड विसापूरचा कायापालट होत आहे.
तारीख : 15-04-2025श्रेणी :राजकारण
कासारसाई (Kasarsai) : येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक उद्या (बुधवार, १६ एप्रिल) पार पडणार असून कारखाना सभागृहात यासाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली.
या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम ठरवण्यात आला असून, दुपारी १ ते १.३० या वेळेत नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृती, १.३० ते २ या वेळेत छाननी, २ वाजता वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध, त्यानंतर २ ते २.३० या वेळेत नामनिर्देशन पत्र माघार घेता येणार आहे. दुपारी २.३० वाजता अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर लगेचच २.३० ते ३ या वेळेत मतदान आणि ३ ते ३.३० दरम्यान मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर तत्काळ नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात येईल.
या निवडणुकीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेलने यापूर्वी सर्व जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यावेळी नव्याने बहुतांश संचालक मंडळात सहभागी झाले असून, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्याच नेतृत्वाखाली संचालक मंडळाची निवडणूक लढवली गेल्यामुळे अध्यक्षपदी त्यांचीच फेरनिवड होणारे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. आतापर्यंत कारखान्याच्या उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे बापूसाहेब भेगडे संचालक म्हणून पुन्हा निवडून आले आहेत. त्यांनाच पुन्हा संधी मिळणार की नवीन उपाध्यक्ष निवडला जाणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
कारखान्याच्या भविष्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, नवे नेतृत्व कोणाच्या हातात येते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तारीख : 11-04-2025श्रेणी :राजकारण
कामशेत (Kamshet) : मित्र पक्षाकडून कायमच रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरले जाते. सत्तेचा वाटा योग्य प्रमाणात दिला जात नाही. अशा परिस्थितीत आपली स्वबळावर लढण्याची तयारी असायला हवी, असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे राष्ट्री अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. कामशेत (ता. मावळ) येथे रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, फक्त बौद्ध समाजाच नाही तर सर्व समाजातील लोकांशी सलोख्याचे संबंध असायला हवे. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करणे ही कायमच आपल्या पक्षाची भूमिका आहे. तसेच पक्ष बांधणीत आपली योग्य भूमिका बजावली पाहिजे.
महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातून बहुसंख्य कार्यकर्ते या अभ्यास शिबिराच्या निमित्ताने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी उद्योग, व्यवसाय, समाजकारण याचबरोबर पक्ष बांधणीत आपली भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. उद्योग आणि व्यवसाय चे मार्गदर्शन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (DICCI) चे पश्चिम भारत अध्यक्ष संतोष कांबळे यांनी केले. तर पक्ष बांधणीबाबत मार्गदर्शन विजय खरे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सूर्यकांत वाघमारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष राजाभाऊ सरवते हे होते. यावेळी राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर, मातंग आघाडी अध्यक्ष आण्णा वायदंडे, युवक अध्यक्ष पप्पू कागदे, संघटक सचिव परशुराम वाडेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, ज्येष्ठ साहित्यिक शरण कुमार लिंबाळे, ज्येष्ठ विचारवंत अँड. दिलीप काकडे, मंदार भारदे, अरुण खोरे, गणेश गायकवाड, युवक अध्यक्ष समीर जाधव, मालन बनसोडे, अशोक सरवते, विक्रम शेलार, अंकुश सोनवणे, रूपेश गायकवाड, सिद्धार्थ चौरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी तर आभार पाश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड व मावळ तालुका अध्यक्ष आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव यांनी मानले.
तारीख : 08-04-2025श्रेणी :राजकारण
पवनानगर (Pawnanagar) : पवना कृषक सेवा सहकारी संस्थेची नुकतीच निवडणूक पार पडली. सुरुवातीपासूनच अनेक मोठमोठ्या राजकीय उलथापालथींनी या निवडणुकीत रंगत आणली होती. मतदानाच्या काहीकाळ आधी ही निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र असताना ऐनवेळी झालेल्या लॉबिंगमुळे निवडणूक लागली आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत चळवळी लक्षात घेता निवडणूकीचा खेळखंडोबा होताना दिसताच भाजप पुरस्कृत पॅनलने डाव साधला. १३ पैकी ९ जागांवर दणदणीत विजय मिळवत १९९० पासून सत्ता टिकवलेला गड पुन्हा एकदा राखला. तर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले.
पवना कृषक सेवा सहकारी संस्था ही चाळीस गावांचे कार्यक्षेत्र असलेली मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी संस्था आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देऊन चांगल्या प्रकारे कारभार करणारी १९८०-१९९० च्या दशकातील ही एक नावारूपाला आलेली संस्था होती. परंतु १९९० नंतर विविध विकास सेवा संस्थेची स्थापना झाल्यानंतर पवना कृषक संस्थेला अवकळा लागली. अनेक वर्षे या संस्थेवर भाजपाचे वर्चस्व होते. यामुळे या निवडणुकीत भाजपने आपला पुरस्कृत पॅनल उभा केला होता.
मात्र निवडणूकीच्या दोन दिवस अगोदर दोन्ही पॅनलमध्ये समझोता होऊन तेरा उमेदवार बिनविरोध निवड करण्याचे ठरले. यात भाजपा पुरस्कृत पॅनल ला ७ जागा व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला ६ जागा असा फॉर्म्युला विद्यमान आमदार सुनील शेळके आणि अँड नामदेव दाभाडे यांच्या मध्यस्थीने ठरविण्यात आला.
मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया ही नियमानुसार होणार हे घोषीत केल्याने निवडणूक होत असताना राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोधसाठी एकमत होत नव्हते. दुपारी तीन वाजेपर्यंत एकही मतदाराने मतदान न केल्याने दोन्ही गटाकडून ५० मतदान करून निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे ठरले. मात्र अचानक काही मतदारांनी येऊन आपला हक्क बजावला आणि दोन्ही पक्षांची एकच धावपळ उडाली. मतदानाला अवघा एक तास बाकी असताना मोठ्या प्रमाणात मतदार येथे आले. त्यांनी हक्क बजावला. यात भाजप मित्र पक्ष पक्षाला ९ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला केवळ चार देत भाजपाने गड राखला.
दरम्यान, या निवडणुकीमुळे भाजपाला नवसंजीवनी मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे -
सर्वसाधारण - भाऊ संतू सावंत, अर्जुन बबन दहिभाते, गोविंद गणपत घारे, अंकुश तातेराम पडवळ, किसन विष्णू घरदाळे (भाजपा)
महिला - लक्ष्मीबाई किसन आडकर (भाजपा)
अनुसूचित जाती जमाती - अंकुश ज्ञानदेव सोनवणे (भाजपा)
इतर मागास प्रवर्ग - शेखर मारुती दळवी (भाजपा)
भटक्या विमुक्त जाती जमाती - बाळू चिंधू आखाडे (भाजपा)
राष्ट्रवादी आमदार गट
सर्वसाधारण - अनिल भागू तुपे, धोंडू शिवराम कालेकर, राम बारकु नढे, महिला - सुशिला रामदास घरदाळे
तारीख : 08-04-2025श्रेणी :राजकारण
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : मावळ तालुक्यातील साते येथील यशवंत ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या चेअरमनपदी विजयराव उभे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी चेअरमन नामदेवराव गाभणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी संस्थेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यामध्ये विजयराव उभे यांचा चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संस्थापक भाऊसाहेब आगळमे, माजी चेअरमन नामदेव गाभणे, संचालक सचिन आवटे, विजय शिंदे, प्रकाश आगळमे, मारुती आगळमे, लक्ष्मीबाई आगळमे, भरत आगळमे, संस्थापिका सुलभा गावडे, रोखपाल संतोष शिंदे व सर्व संचालक मंडळ शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
दरम्यान, निवडीनंतर बोलताना विजय उभे यांनी संस्थेच्या योजनांचा सभासदांना लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. निवडीनंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल भंडाऱ्याची उधळण करत आनंदोस्तव साजरा केला.